नेरपिंगळाई येथे पाण्यासाठी हाहाकार;ग्रामपंचायत वर नागरिकांचा घागर मोर्चा.
प्रतिनिधी प्रविण पाचघरे सह प्रमोद घाटे
नेरपिंगळाई : गेल्या अनेक वर्षांपासून नेरपिंगळाई येथे पाणी टंचाई आहे. अडीच वर्षांपुर्वी पाणी, स्वच्छता अशा मुद्यावर ग्रामविकास आघाडी पॅनलने वरिल मुद्यावर निवडणूक जिंकली मात्र ७/८ महिन्यांपूर्वी सस्तेतील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच वर अविश्वास प्रस्ताव आणला व ग्राम विकास आघाडी फुटली त्यामध्ये सत्तेत सहभागी भारतीय जनता पार्टी, कांग्रेस शिवसेना सहभागी होती मात्र कोर्टाने अविश्वास प्रस्ताव रद्द करून परत सरपंच सविता खोडसकर या वर सरपंच पदि कायम राहिला
सध्या ग्राम पंचायत नेरपिंगळाई मधे १० सदस्य वेगळे व ७ सदस्य वेगळे असे दोन गट पडले,. मात्र मागील काही तांत्रिक कारणांमुळे ६/७ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेरपिंगळाई येथे पाणी प्रश्न पेटला आहे.
सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत च्या विरोधात गावकरि संतप्त झाले होते सरपंच व ग्रामसेवकशी संपर्क साधला असता सरपंच सविता खोडसकर यांनी पाणी टंचाई बद्दलचा मोर्चा हा राजकीय दृष्ट्यिकोणातून काढण्यात आला व सांगितले की माझ्या मुलगा आजारी असल्याने उपचारासाठी मोर्शी येथील दवाखान्यात होती व मोर्च्याची माहिती नव्हती जर माहिती असती तर हि ग्रामपंचायत ला येण्याची पूरेपूर प्रयत्न केला असता.
मोर्च्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार लुले साहेब व कर्मचाऱ्यांनी वरील प्रकरण शांततेच्या मार्गाने हाताळले…